वेंगुर्ला तालुक्यातील विविध प्रश्न जनता दरबारात मार्गी : कमलेश गावडे.

वेंगुर्ला तालुक्यातील विविध प्रश्न जनता दरबारात मार्गी : कमलेश गावडे.

वेंगुर्ला.

   पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ओरोस जिल्हा नियोजन सभागृहात दिनांक १४ ऑगस्ट रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भाजप शक्ती केंद्र प्रमुख कमलेश गावडे यांनी वेंगुर्ला तालुक्यातील विविध प्रश्न मांडले.यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील महाराष्ट्र विद्युत वितरणा संदर्भात बऱ्याच अडचणी वेंगुर्ला तालुक्यामध्ये असून महत्त्वाचा मुद्दा हा की, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडून पावसाळा ऋतू सुरू होण्यापूर्वी कोणतीच पूर्व तयारी केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाऊस व अति वेगाच्या वाऱ्यामुळे प्रत्येक ठिकाणची झाडे उलमडून पडतात. व पावसाळ्यात विद्युत पोल, विद्युत वाहिनी पडून जनतेच्या जिवीतास धोका निर्माण होतो. तसेच यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होऊन सर्व जनतेच्या शासकीय व निमशासकीय कामांवर त्याचा मोठा परिणाम होतो. तसेच वेंगुर्ला तालुक्यातील उपविभागीय रुग्णालयामध्ये तज्ञ डॉक्टर नाही, क्ष-किरण मशीन आठवड्याच्या दोन वारच उपलब्ध आहे, रुग्णवाहीका १०२ संदर्भात योग्य नियम व अटी करणे आवश्यक आहे. तसेच ज्या संस्थांना खाजगी रुग्णवाहिका दिलेल्या आहेत. त्यासंदर्भात त्यांचा होणारा मनमानी कारभार, तसेच अतिगंभीर रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका मिळत नसलेबाबत. तसेच वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालयामध्ये लाईट गेल्यानंतर पर्यायी लाईट ची सोय नाही. तसेच वेंगुर्ला तालुक्यातील कृषी सहाय्यक एकूण सहा पदे रिक्त आहेत.पिक विमा कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्याची फसवणूक संदर्भात. तसेच ग्रामपंचायत कामकाज काम करताना येणारे इंजिनियर तसेच ग्रामसेवक उपस्थित नसल्याने त्यासंदर्भातील अडचणी व इंटरनेट सेवा संदर्भात येणाऱ्या अडचणी,ग्रामपंचायत पालमध्ये मंजूर असलेले हर घर जल ही योजना कामकाज गेली सात महिने बंद आहे. केंद्र शासनाची रोजगार हमी योजनेतील सिंचन विहीर योजना आहे. त्या योजनेला नियंत्रित सत्ता प्रकारच्या म्हणजेच भोगवटा वर्ग-२ च्या जमिन मिळकतीला सदरहू योजना लागू होत नाही.अशा विविध मागण्या यावेळी जनता दरबारात मांडल्या गेल्या.
   यावेळी आयोजित जनता दरबारात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सर्व प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत क्ष - किरण मशीन कायमस्वरूपी चालू ठेवणे तसेच तज्ञ डॉक्टर 31 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध करून देणे, 102 ॲम्बुलन्स ही सर्वसामान्य माणसाला आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध करून देणे, औषध खिडकी सकाळी व सायंकाळी चालू ठेवणे तसेच शौचालय नवीन बांधण्यात आले होते व ते बंद केले होते ते अर्ध्या तासाच्या आत चालू करणे अशा सूचना जिल्हा वैद्यकीय अधिकारी श्रीपाद पाटील यांना दिल्या.तसेच वर्ग दोन जमिनी आहेत ते सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव रद्द होतो त्याचा जीआर काढावा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आले तसेच पिक विमा कंपनीकडून होणारा शेतकऱ्यांवर अन्याय यासाठी ताबडतोब त्यांना पत्रव्यवहार करून माहिती मिळवून निर्णय देणे अशा सूचना संबंधित अधिकारी यांना तात्काळ देण्यात आल्या.