सुवर्णदुर्ग रोपवेला महायुती सरकारचा हिरवा कंदील, मिहीर महाजन यांनी मानले आभार

सुवर्णदुर्ग रोपवेला महायुती सरकारचा हिरवा कंदील,  मिहीर  महाजन यांनी मानले आभार


दापोली 


       रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याला जोडणारा बहुप्रतीक्षित रोपवे प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. महायुती सरकारने झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी दिली असून शासन निर्णय जाहीर झाला आहे. केंद्र सरकारच्या 'पर्वतमाला' योजनेअंतर्गत हर्णे येथील गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला या समुद्रावरील रोपवेच काम पूर्णत्वाला जाणार आहे. या निर्णयामुळे दापोलीच्या पर्यटन, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळण्याची अपेक्षा आहे. दापोलीचे सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम व्यावसायिक मिहीर महाजन यांनी या प्रकल्पासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला असून, त्यांनी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. हा रोपवे प्रकल्प दापोलीतील पर्यटन प्रेमी आणि अभ्यासकांच दीर्घकालीन स्वप्न होत. मिहीर महाजन यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हर्णे येथील गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला असा समुद्रावरून जाणारा रोपवे उभारण्याची मागणी केली होती. त्यावेळी गडकरी यांनी, "महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव सादर केल्यास मी हा प्रकल्प पूर्ण करेन," अस आश्वासन दिल होत. या आश्वासनानंतर महाजन यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.या प्रयत्नांना विधान परिषदेच्या भाजप आमदार उमा खापरे यांच मोलाच मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल. तत्कालीन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेऊन महाजन यांनी रोपवेसाठी आग्रह धरला. लोढा यांनी तात्काळ पर्यटन विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. सुवर्णदुर्ग किल्ला हा ऐतिहासिक वारसा असलेला स्थळ असल्याने पुरातत्व विभागाची परवानगीही महत्त्वाची होती. त्यासाठी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली असता, त्यांनी या प्रकल्पाच महत्त्व ओळखून नितीन गडकरी यांना शिफारस पत्र पाठवल. त्यानंतर चिंचवड येथे पुन्हा गडकरी यांची भेट घेऊन महाजन यांनी अंतिम मंजुरीसाठी आग्रह धरला.महायुती सरकारच्या कारभारामुळे कॅबिनेट बैठकीत या रोपवेला हिरवा कंदील मिळाला. केंद्र सरकारच्या 'पर्वतमाला' योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवला जाणार असून, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक्स व्यवस्थापन (NHLM) आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्याची अंमलबजावणी होईल. हा रोपवे गोवा किल्ल्यापासून सुवर्णदुर्ग किल्ल्यापर्यंत समुद्रावरून जाणारा असेल, ज्यामुळे पर्यटकांना अनोखा अनुभव मिळेल.सुवर्णदुर्ग किल्ला हा मराठ्यांच्या जलदुर्गाचा ऐतिहासिक वारसा असून, मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच जन्मस्थान म्हणूनही ओळखला जातो. या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सध्या बोटींचा वापर केला जातो मात्र, रोपवे सुरू झाल्यास पर्यटकांना अधिक सुलभ आणि आकर्षक पर्याय उपलब्ध होईल. यामुळे दापोलीच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होईल.हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दापोलीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने स्थानिक व्यावसायिक, हॉटेल्स आणि छोटे उद्योग यांना फायदा होईल. दापोलीचे आमदार आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.मिहीर महाजन यांनी या प्रकल्पासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करणाऱ्या नितीन गडकरी, मंगलप्रभात लोढा, सुधीर मुनगंटीवार, योगेश कदम आणि उमा खापरे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. "हा रोपवे दापोलीच्या पर्यटनाला नव आयाम देईल आणि स्थानिकांना आर्थिक लाभ मिळवून देईल," अस महाजन म्हणाले. दापोलीकरांच्या वतीने त्यांनी सरकारच्या या निर्णयाच स्वागत केल आहे.हा रोपवे प्रकल्प दापोलीच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असून, येत्या काळात त्याच्या कामाला सुरुवात होण्याची प्रतीक्षा पर्यटन प्रेमींना आहे.