विद्यामंदिर परुळेच्या अर्पिता सामंतचा सामाजिक कार्यकर्ते नितिश कुडतरकर यांनी केला सत्कार.

वेंगुर्ला.
तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या प्रशालेची विद्यार्थिनी कु.अर्पिता अमेय सामंत हिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) मार्च 2024 उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी (फेरतपासणीसाठी) अर्ज केला होता.या पुनर्मुल्यांकनानंतर ३ गुण वाढल्याने तिचे एकूण गुण ५०० पैकी ५०० गुण (१००%) झाले आहेत. फेरतपासणीनंतर तिचे शंभर टक्के गुण झाल्याने ती राज्यात प्रथम आल्याने सामाजिक कार्यकर्ते नितिश कुडतरकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.