भारताची चीनच्या ‘तिसऱ्या डोळ्या’ला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची तयारी! देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल.

भारताची चीनच्या ‘तिसऱ्या डोळ्या’ला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची तयारी!  देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल.

दिल्ली.

   भारताने चीनचा ‘तिसरा डोळा’ अर्थात सीसीटीव्हींवर नियंत्रण आणण्याची तयारी सुरू केली आहे. दीर्घकाळापासून चीन या तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने देशातील तमाम घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात सद्यस्थितीत २० लाख सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. देशातील मोठ्या १५ शहरांत ही संख्या १५ लाखांच्या आसपास आहे.
   एकट्या दिल्लीत अडीच लाखांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यातील सुमारे ८० टक्के कॅमेरे चीनकडून मागवले आहेत. याच दरम्यान सरकारने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत नवे नियम जाहीर केले आहेत. नव्या नियमांनुसार, भारतात सीसीटीव्हींची विक्री करण्यासाठी कठोर सुरक्षा मानकांचे पालन करण्यासाठी त्यांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. भारताच्या या पावलामुळे चीनच्या हेरगिरी कारवायांवर मोठ्या प्रमाणावर अंकुश बसेल.