आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला प्रत्येक बुथवर ५१ टक्के मते मिळवुन देण्याची जबाबदारी ‘सुपर वाॅरीयर्स‘ ची : राजन तेली.

आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला प्रत्येक बुथवर ५१ टक्के मते मिळवुन देण्याची जबाबदारी ‘सुपर वाॅरीयर्स‘ ची : राजन तेली.

वेंगुर्ला.

   भाजपा वेंगुर्ला शहरातील सुपर वाॅरीयर्स, बुथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजप चे सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली, बुथ रचना संयोजक व जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई व अँड.सुषमा खानोलकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शहर प्रभारी राजन गिरप, विस्तारक मोहन घुमे ,महीला तालुकाध्यक्षा सुजाता पडवळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी मार्गदर्शन करताना मा.आम.राजन तेली म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीला दोन महीने उरले आहेत. या निवडणुकीत आपल्या पक्षाने एकुण मतदानाच्या ५१ टक्के मते मिळविण्याचे उदिष्ठ ठेवले आहे. या वेळच्या निवडणुकीत आपल्याला बुथ पातळीवरील लढाई जिंकायची आहे. त्यादृष्टीनेच केंद्रीय नेतृत्वाने गेली चार वर्षे विविध कार्यक्रम, अभियानाची आखणी केली होती. " मेरा बुथ सबसे मजबूत", " घरो - घरी संपर्क ", " संपर्क से समर्थन", " नव मतदार नोंदणी " ," सरल अँप " द्वारे प्रत्येक विधानसभेत ३० ते ५० हजार नागरिकांची नोंदणी करणे," सरल अँप " द्वारे नागरिकांपर्यंत मोदी सरकारच्या कामांची माहीती थेट पोहचवीणे, " धन्यवाद मोदीजी " च्या माध्यमातून मोदी सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या लाभार्थीपर्यंत संपर्क करणे, " फ्रेंड ऑफ बीजेपी " द्वारे पक्षाच्या सहानभुतीदारांना पक्षाच्या प्रवाहात आणणे, तरुण वर्गाला पक्षासोबत जोडण्यासाठी " युवा वाॅरीयर्स " यासारखे अनेक उपक्रम पक्ष संघटनेने गेल्या चार वर्षांत राबवलेले आहेत. या उपक्रमाची रचना अत्यंत विचारपूर्वक केली होती. पक्षाच्या हक्काच्या मतदाराबरोबर पक्षाशी कधीच संबंध न आलेले मतदारही या माध्यमातून पक्ष यंत्रणेच्या संपर्कात आले. त्यामुळे बुथ प्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख यांना नेमुण दिलेली कामे मुदतीत आणी योग्य पद्धतीने केली तर ५१ टक्के मतांचे उद्दीष्ट सहजरीत्या साध्य होईल असे प्रतिपादन राजन तेलीसाहेब यांनी केले
   यावेळी बुथ रचना संयोजक व जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
   यावेळी मार्गदर्शन करताना महेश सारंग म्हणाले कि आगामी लोकसभा निवडणूक ही कमळ निशाणी वरच लढवली जाणार असून, आपला विजय नक्की आहे म्हणुन कार्यकर्त्यांनी गाफील राहून चालणार नाही. प्रत्येकाने आपल्या बुथ वर हक्काच्या मतदारा बरोबर लाभार्थी, सहानुभूतीदार, विचार परिवारातील सदस्य यांचे अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठीची यंत्रणा उभी करणे गरजेचे असल्याचे सांगीतले . यासाठी बुथ पातळीवरील कार्यकर्त्याचे काम अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगीतले.
   यावेळी ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, महीला मोर्चा जि.सरचिटणीस वृंदा गवंडळकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, माजी नगरसेवीका शितल आंगचेकर, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर,साक्षी पेडणेकर, पुनम जाधव, महीला अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, सोशल मिडीयाचे अमेय धुरी, महीला मोर्चाच्या वृंदा मोर्डेकर, आकांक्षा परब, रसीका मठकर, ता.चिटणीस जयंत मोंडकर, बुथप्रमुख अजित कनयाळकर, रविंद्र शिरसाठ, शेखर काणेकर, पुंडलिक हळदणकर, युवा मोर्चाचे साई भोई, भुषण सारंग, सुनिल मठकर इत्यादी उपस्थित होते.