सर्व संस्थानी वेताळ प्रतिष्ठान सारखं समाजाभिमुख कार्य करावे : उद्योजक भाई मंत्री. विविध क्षेत्रातील व्यक्तीचा मानपत्र देऊन विशेष सन्मान.

सर्व संस्थानी वेताळ प्रतिष्ठान सारखं समाजाभिमुख कार्य करावे : उद्योजक भाई मंत्री.  विविध क्षेत्रातील व्यक्तीचा मानपत्र देऊन विशेष सन्मान.

वेंगुर्ला.

   वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या अश्वमेध तुळस महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धा तब्बल ३५ गटात संपन्न झाल्या या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ,विविध क्षेत्रातील व्यक्तीचा सन्मान सोहळा आणि खुल्या ग्रुप डान्स आणि खुल्या जोडीनृत्य स्पर्धा चे उद्घाटन उद्योजक भाई मंत्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि सामाजिक कार्यकर्ते जालिंदर परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
   यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योगपती दादासाहेब परुळकर, सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, उद्योजक दादा झांट्ये, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री परुळेकर, निवृत प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, गजानन नाटेकर, सूरज परब, मुख्याध्यापक अँथोनी डिसोजा, माजी प.स.सभापती अनुश्री कांबळी, नारायण नागवेकर, सुजाता पडवळ, माजी सरपंच शंकर घारे व विजय रेडकर,आनंद तांडेल, अरविंद नाईक,प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
    खुल्या ग्रुप डान्स स्पर्धेत चिमणी पाखरं डान्स अकॅडमी (कुडाळ) नृत्याचे बहारदार सादरीकरण करत  विजेते ठरले. तर *खुल्या जोडी नृत्य स्पर्धेत सोहम जांभोरे व  ऋत्विक ठाकर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. दोन्ही नृत्य स्पर्धामध्ये जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
   मी, गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात असून वेताळ प्रतिष्ठान सारखे समाजाभिमुख कार्य पाहिलेले नाही.अनेक क्षेत्रांत काम करीत असताना प्रतिष्ठान ने जो मापदंड घालून दिला त्याचे अनुकरण इतर संस्थानी केल्यास अनेक सामाजिक उपक्रमातून  लोकांचे कल्याण होईल' असे प्रतिपादन उद्योजक भाई मंत्री यांनी केले.
   यावेळी विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीचा मानपत्र, शाल ,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये कोरोना काळात तसेच नैसर्गिक आपत्ती, वादळे आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सिंधुदुर्ग आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री दत्तात्रय परुळेकर, दशावतार मध्ये पहिले आत्मचरित्र लिहिणारे ज्येष्ठ दशावतार मास्टर दामू जोशी, आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त लोकमतचे पत्रकार भैया गुरव, तर कै. बाबली विष्णू परुळकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार प्रतिमा राजेश पेडणेकर आणि तुळशीदास  मधुकर पाटकर यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभाग सांगली च्या  सहायक विभागीय अधिकारी पदी नेमणूक झाल्याबद्दल मुख्याध्यापक अँथोनी डिसोजा, निवृत्त प्राचार्य डॉ आनंद बांदेकर, सर्पमित्र अनिल गावडे, रक्तदान क्षेत्रात योगदान देणारे ॲलिस्टर ब्रिटो यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.तर प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रा. सचिन परुळकर यांनी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान उद्योजक भाई मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

  खुल्या ग्रुप डान्स स्पर्धेत जिल्ह्यातील  नामांकित संघांनी सहभाग घेतला. यामध्ये ग्रुप डान्स स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक - चिमणी पाखरं डान्स अकॅडंमी कुडाळ
द्वितीय क्रमांक - सिद्धाई अकॅडमी (कुडाळ)
तृतीय क्रमांक - आर डी एक्स ग्रुप(सावंतवाडी)
उत्तेजनार्थ प्रथम - एस.के.ग्रुप (कणकवली)
उत्तेजनार्थ द्वितीय - ओमी डान्स अकॅडमी (तळवडे).

   खुल्या जोडी नृत्य निकाल पुढील प्रमाणे -

प्रथम क्रमांक - सोहम जांभोरे व ऋत्विक ठाकर
द्वितीय क्रमांक -दिशम परब व जयेश सोनुर्लेकर 
तृतीय क्रमांक - दीक्षा नाईक व संजना पवार 
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक - सिद्धी बोभाटे व निखिल कांबळे
 उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक - स्वरा पावसकर व दुर्वा पावसकर.

    यावेळी शालेय मुलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
प्रथम क्रमांक - चिन्मय रघुनाथ कुडपकर (एम आर देसाई स्कूल,वेंगुर्ला).
द्वितीय क्रमांक - काशिनाथ संतोष तेंडोलकर ( केंद्र शाळा मठ न १).
तृतीय क्रमांक - चेत्रश्री नंदकिशोर बुगडे ( जनता विद्यालय तळवडे).
उत्तेजनार्थ प्रथम - वैष्णवी राजाराम कोचरेकर ( न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा ).
उत्तेजनार्थ द्वितीय-  निधी यशवंत पेडणेकर (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा).
   सर्व विजेत्याना  मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. नृत्य स्पर्धेचे परीक्षण  महेंद्र मातोंडकर आणि कत्थक विशारद मृणाल सावंत यांनी तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षण अनिल परुळकर यांनी केलं. निवेदन प्रा.डॉ. सचिन परुळकर तर आभार बी.टी.खडपकर यांनी मानले.सर्वच कार्यक्रमांना स्पर्धकांचा आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.