राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी.

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी.

मुंबई.

  राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर अजूनही कायम आहे. पुणे आणि नाशिकमध्ये रविवारी झालेल्या पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. यामुळे नाशिकमधील गोदावरी तर पुण्यातील मुळा-मुठा नदीला पूर आला आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील भागात पाणी शिरले आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भेट देणार आहे. राज्यात पावसाचा जोर अजूनही चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
    हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पालघर, ठाणे, मुंबईला सुद्धा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, कोल्हापूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आज व रायगडला काही ठिकाणी जोरदार त्यातील जोरदार तर तुरळ ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे २०० मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. ठाणे, मुंबई, रत्नागिरी मध्ये काही ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकणात आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकणातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
   मध्य महाराष्ट्रात नाशिक पुणे व सातारा या जिल्ह्यांच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे २०० मीमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मैदानी भागात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आज कोल्हापूर व उद्या पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा व तुरळक ठिकाणी वादळी वाढत पाऊस पडण्याची शक्यता शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात सहा ते आठ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.