वेताळ प्रतिष्ठानच्या महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १०६ जणांनी केले रक्तदान. ३०० रक्तदात्यांचा आणि १० रक्तदान शिबिर आयोजक संस्थांचा करण्यात आला विशेष सन्मान.

वेताळ प्रतिष्ठानच्या महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १०६ जणांनी केले रक्तदान.  ३०० रक्तदात्यांचा आणि १० रक्तदान शिबिर आयोजक संस्थांचा करण्यात आला विशेष सन्मान.

वेंगुर्ला.

   'इमान ईथल्या मातीशी, माणूसकीच्या नत्याशी' त्याचे ब्रीदवाक्य घेऊन सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग  तुळस आयोजित २५ व्या महारक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी १०६ जणांनी उत्स्फूर्त रक्तदान करून प्रतिष्ठानला सहकार्य केले.
  वेताळ प्रतिष्ठान च्या वतीने सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात गेल्या नऊ वर्षांमध्ये सलग २४ रक्तदान शिबिरांची यशस्वी वाटचाल करताना  यावेळी विविध सहयोगी संस्थां आणि रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोवा यांच्या सहकार्याने उत्सव मंगल कार्यालय तुळस येथे आयोजित केलेल्या २५ व्या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून  करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तुळस गावचे सुपुत्र उद्योजक दादासाहेब परुळकर, उद्योजक सुधीर झांट्ये, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, जैतिराश्रीत संस्थेचे अध्यक्ष ॲड प्रभानंद सावंत, उपाध्यक्ष विष्णू परब, लोकमान्य बँक चे चक्रपाणी गवंडी, वाचनालयाचे अध्यक्ष सगुण माळकर, मेडिकल कॉलेज वेंगुर्ला च्या डॉ. पूजा कर्पे,  प्रकाश परब, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, नारायण कुंभार, चरित्रा परब, रतन कबरे, विनिता शेटकर, आनंद तांडेल, सुजाता पडवळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.डॉ.सचिन परुळकर, रक्तपेढी गोवा मेडिकल कॉलेज चे वैद्यकिय अधिकारी डॉ. संजय कोरगांवकर, मंगेश राऊळ, मिलिंद शेटकर, संजय परब,संदीप पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
   विशेष म्हणजे प्रतिष्ठांच्या रक्तदान क्षेत्रातील वाटचालीत आतापर्यंत रक्तदान शिबिरात ज्या ज्या नियमित रक्तदान करणाऱ्या व  प्रतिष्ठानच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार  प्रत्यक्ष हॉस्पिटल मध्ये जाऊन नेहमीच रक्तदान करणाऱ्या  सुमारे ३०० पेक्षा जास्त रक्तदात्याचा शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. तसेच वेंगुर्ला तालुक्यामध्ये ज्या संस्था नियमितपणे रक्तदान शिबिरे आयोजित करतात अशा रोझारिओ मित्र मंडळ उभादांडा-वेंगुर्ला, गरुडझेप मित्र मंडळ राऊळवाडा-वेंगुर्ला, रोझारिओ युथ ग्रुप उभादांडा-वेंगुर्ला, आयुष चॅलेंजर्स मित्र मंडळ परबवाडा-वेंगुर्ला, शिवप्रेमी यशवंतगड रेडी, युनिक ब्लड मोटिवेटर्स, महापुरूष युवा मित्रमंडळ, शिरोडा, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला संस्थांचा विषय सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.
   जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस ही अनेक  सामाजिक उपक्रम घेणारी संस्था असून रक्तदान, स्वच्छता, कला, क्रीडा, सांस्कृतीक अशा सर्व क्षेत्रांमध्ये समावेशक कार्य करीत आहे, तुम्ही रक्ताचे नाते जपता आहात, त्यासाठी आवश्यक सहकार्य जिल्हा बँकेच्या वतीने सदैव केले जाईल असे प्रतिपादन केले.
   तसेच नितीन मांजरेकर यांनी प्रतिष्ठानच्या अनेक उपक्रमांचा आढावा घेत मी प्रतिष्ठानचा कार्याचा चाहता असून त्यांच्याकडून सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य होत आहे. प्रतिष्ठानच्या रूग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजूंना मोलाची मदत होत आहे. त्यांच्या या सेवेबद्दल सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या वतीने आभार मानतो, असेच आपले सामाजिक कार्य अखंड सुरू ठेवा असे प्रतिपादन करत गौवोद्गार काढले.
   यावेळी अनेक मान्यवरांनी रक्तदान सारख्या पवित्र कार्याचा आणि सामाजिक उपक्रमांचा आढाव घेत प्रतिष्ठानचे उपक्रमांचा कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
   या रक्तदान शिबिरासाठी ग्रामपंचायत तुळस, लोकमान्य कॉ ऑपरेटिव्ह बँक शाखा वेंगुर्ले, तुळस श्री देव जैतिराश्रीत संस्था मुंबई, बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले, गुरुकुल शिक्षण संस्था न्हावेली, श्री चिंतामणी प्रतिष्ठान वेंगुर्ले, सातेरी महिला मंडळ तुळस, कुंभारटेंब युवक कला क्रीडा मंडळ, तुळस, देसी बॉयज क्रिकेट संघ होडावडा, झेंडोबा कला क्रीडा मंडळ- पाल, लोकनेता दत्ता पाटील मेडिकल कॉलेज वेंगुर्ला एन एस एस विभाग आदी संस्थांनी सहयोग संस्था म्हणून सहकार्य केले.
   रक्तदान करण्याठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.अनेक रक्तदात्यांनी प्रतिष्ठान ने आपल्या सारख्या सामान्य माणसाचां सन्मान केला त्याबद्दल ऋण व्यक्त करून उपक्रमाविषयी ऋण व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश राऊळ, सुधीर चुडजी, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत, नाना राऊळ, रोहन राऊळ,  किरण राऊळ, किशोर राऊळ, सचिन राऊळ, प्रविण राऊळ, प्रसाद भणगे, राजेश परुळकर, प्रदीप परुळकर, सागर सावंत,प्रीती परुळकर,प्रतीक परुळकर, प्रज्वल परुळकर, दीपक नाईक,यशवंत राऊळ,सचिन गावडे, संदीप तुळसकर, राजेश चौगुले,जान्हवी सावंत, वैष्णवी परुळकर,भक्ती भणगे, हेमलता राऊळ, प्रांजली सावंत, कुंदा सावंत, निकिता कबरे,गणेश सावंत,विधी नाईक,प्रमोद तंबोसकर यांनी मेहत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर यांनी तर आभार माधव तुळसकर यांनी मानले.