हिंदुधर्माभिमानी मंडळींच्यावतीने वेंगुर्लेत शिवराज्यभिषेक दिन साजरा

वेंगुर्ला
हिंदुधर्माभिमानी मंडळींच्यावतीने वेंगुर्लेत माणिकचौक येथील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच शिवप्रार्थना म्हणुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन अभिवादन केले तसेच कु. शिवानी खानोलकर हिने शिवराज्यभिषेक दिनाचे महत्व विषद केले. यावेळी हिंदु साम्राज्यदिनाची माहिती सांगताना बाबुराव खवणेकर म्हणाले कि, 6 जून 1974 या दिवशी जगामध्ये एक अघटीत घटना घडली ती म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक अद्भुत, उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. रयतेचा राजा छत्रपती झाला, अठरा पगड जातीतील सर्व सामान्य घरातील तरुणांना संघटित करून हिंदूंचा राजा होऊ शकतो हे जगाला दाखवून दिले. अनेक देश त्यांच्या धोरणांचा, नितींचा अभ्यास करीत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य माणसामध्ये हे राज्य माझे/आमचे आहे असा विश्वास महाराजांनी निर्माण केला. केवळ राज्याभिषेक नाही तर राजाने जनतेचा विचार कसा करायला पाहिजे याची संपूर्ण व्यवस्थाच निर्माण केली म्हणून तर 400 वर्षांनंतरही या राजाचा जयजयकार तितक्याच प्रेरणेने आपण करतो. शिवराज्याभिषेकाने आपल्याला हेच दान दिलेले आहे असे ते पुढे म्हणाले. यानंतर उपस्थीत हिंदुधर्माभिमानी मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा केला