विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना सोशल मीडिया पासून दूर रहावे : राजकुमार मुंडे. आशिये ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न.

कणकवली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय नोकरी भरतीत मुलांचा दुर्लक्ष आहे.आताच्या पोलीस भरतीत नगण्य तरुणांचा सहभाग आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात चांगले घडण्यासाठी मोबाईलचा चांगला उपयोग केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी दहावी बारावी सह अन्य परीक्षांमध्ये मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. या यशाचे सातत्य विद्यार्थ्यांनी कायम राखले पाहिजे.भविष्यात तुम्ही चांगले आधिकारी बनण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.विद्यार्थ्यानी अभ्यास करताना सोशल मीडिया पासून दूर रहावे,असे आवाहन कणकवली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे यांनी केले.
आशिये ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने दहावी, बारावी, पदवीधर, डिप्लोमाधारक तसेच तत्सम शैक्षणिक अर्हता प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी युरेका सायन्स क्लब संचालिका सुषमा केणी,सरपंच महेश गुरव, उपसरपंच संदीप जाधव, मालवणी कवी विलास खानोलकर, ग्रामपंचायत सदस्य मानसी बाणे, विशाखा गुरव, संजना ठाकूर, ग्रामसेवक राकेश गोळवणकर, पोलीस भूषण सुतार, माजी सरपंच शंकर गुरव, माजी उपसरपंच प्रवीण ठाकूर, शिक्षक निलेश ठाकूर, सुनील बाणे, सुहास खानोलकर, रविंद्र बाणे, दिवाकर बाणे, संजय बाणे आदींसह पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.गुणवंत विद्यार्थ्यांना काजूचा वृक्ष भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
युरेका सायन्स क्लब संचालिका सुषमा केणी,तुमच्या गावाने केलेला सत्कार हा सुवर्ण अक्षराने लिहण्यासाठी हा दिवस आहे.आजचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्कार होत आहे.आता शिक्षणात मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे.त्यामुळे मुलांमध्ये अधिकची जाणीव निर्माण आपल्या सिंधुदुर्गातील अनेक मुलांनी मोबाईल मुळे प्रगती केली आहे.प्रत्येक गोष्टीत मुलांना बोलत केलं पाहिजे.५ हजार मुले युरेका सायन्सला जोडली गेली आहेत. भविष्यात किती यश मिळवला तरी मुलांनी गावाला केव्हाही विसरु नका.ज्या विषयात आवड आहे त्या ठिकाणी प्रवेश घेवून घ्या,यश निश्चित मिळेल.तुम्हाला ज्या ठिकाणी समाधान मिळेल,तिथे काम करा.करीयर निवडत असताना घाई करु नका.बऱ्याच स्कॉलरशिप आहेत,शिक्षणासाठी पैशाची गरज नाही.वाचन संस्कृती लोभ पावत चालली आहे.पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन केलं पाहिजे.