सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प - आमदार नीलेश राणे

मालवण
महाराष्ट्र शासन पर्यावरण पूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या 450 कोटी रुपये प्रकल्पांतर्गत देवबाग येथे 158 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली आहे. सर्व घटकांना न्याय देणारा हा परिपूर्ण अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया आमदार नीलेश राणे यांनी दिली.आपण याबाबत राज्य शासनाकडे केलेल्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे ते म्हणाले. खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गतिमान विकास सुरूच राहील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन विभागाच्या मार्फत 450 कोटी रुपयांपैकी माझ्या मतदारसंघातील मालवण तालुक्यातील देवबाग समुद्रकिनाऱ्यासाठी 158 कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आपण आभारी असल्याचे आ. नीलेश राणे म्हणाले.