वेंगुर्ला नगरपरिषद ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ स्पर्धेत कोकण विभागात प्रथम.

वेंगुर्ला नगरपरिषद ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ स्पर्धेत कोकण विभागात प्रथम.

वेंगुर्ला.

   स्वच्छतेसह पर्यावरण रक्षण यासारख्या सर्व क्षेत्रात वेंगुर्ला नगर परिषदेने "माझी वसुंधरा अभियान ४.०" अंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे.त्यामुळे १५००० पेक्षा कमी लोकसंख्या या गटात वेंगुर्ला नगरपरिषदे ला कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून रक्कम ७५ लाखाचे बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे वेंगुर्ला शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.या यशस्वी घोडदौडीमुळे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि वेंगुर्लावासीयांचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
   वेंगुर्ला नगर परिषदेने स्वच्छतेमधून समृद्धीकडे आणि विकासाकडे जाण्याचा मार्ग दाखवून दिला आहे.आज पर्यंत अनेक पुरस्कार या नगरपरिषदेने मिळविले आहेत.मात्र स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा घेतलेला वसा कायम ठेऊन आपले काम सातत्याने पुढे नेले आहे.गेली अडीच वर्ष या नगर परिषदेवर लोकप्रतिनिधी नसताना मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सर्वांना बरोबर घेऊन आपले काम योग्य रीतीने पुढे नेले आहे. वेंगुर्ला शहरातील 'स्वच्छ भारत पर्यटन स्थळ' या नावातच त्याचे वेगळेपण आहे. आणि ते टिकून ठेवले आहे. या ठिकाणी शहरातील घरोघरी निर्माण होणारा कचरा गोळा करुन त्याचे २७ प्रकारात वर्गीकरण करुन या कच-याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करुन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत 'शुन्य कचरा' संकल्पना राबवण्यात आली आणि ती यशस्वी झाली.हे पाहण्यासाठी आज देशभरातून अधिकारी, पर्यटक, नागरिक, विद्यार्थी येत असतात. शहरांमध्ये स्वच्छतेबरोबरच प्लास्टिक पिशव्यांवर बंदी, स्वच्छता मोहिमा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे, विद्यार्थ्यांना स्वच्छते बद्दल महत्व पटावे म्हणून स्वच्छतेवर आधारित विविध वक्तृत्व, चित्रकला, प्रश्नमंजुषा अशा स्पर्धा घेणे.शहरामध्ये वृक्षारोपण वृक्षारोपण करून नागरिकांमध्ये जनजागृती करणे असे विविध उपक्रम सातत्याने राबवत आहेत. त्यामुळेच या स्पर्धेतही वेंगुर्ला नगरपंचायतीने आपली प्रथम क्रमांकाची बाजी कायम राखली आहे.या यशाबद्दल वेंगुर्ला नगरपरिषद चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे