फायनान्स कंपनी कडून झालेल्या फसवणुकीला पोलिस प्रशासन जबाबदार. ग्राहकांचे पैसे परत न केल्यास सी.आय.डी.चौकशीची मागणी करू; शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस.

सावंतवाडी.
सावंतवाडीतील अनेकांची फसवणूक करणाऱ्या संकल्प फायनान्स कंपनीने येथील लोकांना लुटण्याचा कट रचला होता असा आरोप आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी महिला नेत्या अर्चना घारे परब यांनी केला.सालईवाडा परिसरात संकल्प इंटरप्राईजेस या नावाने कार्यालय सुरू करून गोरगरिबांना व्यवसायासाठी कमी व्याज दराने लाखो रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी देत करोडो रुपये जमा करून कंपनीने आपला गाशा गुंडाळला.आम्ही तक्रारी तसेच आवश्यक पुरावे देऊन सुद्धा पोलिसांकडून आवश्यक ती कारवाही होताना दिसली नाही याला पोलिस यंत्रणा देखील जबाबदार आहे दरम्यान संबंधितांनी ग्राहकांचे पैसे परत न केल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयात जावून सीआयडी चौकशीची मागणी करू. काहीही झाले तरी फसवूणक करणाऱ्यांना सोडणार नाही, असेही त्यांनी पुढे सांगितले.
या ठिकाणी चुकीची पध्दत वापरुन तसेच आमीष दाखवून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांची व अपंगाची फसवणूक केली आहे. झालेला प्रकार योग्य नाही याबाबत आम्ही नक्कीच दाद मागणार आहोत. काही झाले तरी ग्राहकांची फसवणूक होणार नाही, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहणार आहे असे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले तसेच प्रथमच हा प्रकार लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीने त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना विरोध केला होता. मात्र काहींनी त्या ठिकाणी आम्हाला कर्ज मिळतय त्यामुळे विरोध करू नका, अशी भूमिका मांडली. त्यामुळे काही अंशी आम्ही गप्प राहिलो, अन्यथा हा प्रकार झालाच नसता. तरीही आता गप्प बसणार नाही. संबंधित ग्राहकांचे पैसे जो पर्यंत मिळत नाही तो पर्यत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे असे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी सांगितले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, शहर अध्यक्ष सायली दुभाषी, हिदायतुल्ला खान, तौसिफ आगा आदी पदाधिकारी उपस्थित होते.