छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास व विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे - विशाल परब शिवसंस्कार सन्मान सोहळ्याचे उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास व विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे - विशाल परब   शिवसंस्कार सन्मान सोहळ्याचे उद्घाटन


सावंतवाडी 
     छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास आणि विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवणे किंबहुना तो नव्या रक्तात रुजणे ही काळाची गरज आहे. समाजापुढची आव्हाने सोडवण्याची ताकद शिवविचारात आहे. शिव संस्कार संस्थेचा उपक्रम हा अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले. दरम्यान छत्रपतींच्या मनातले स्वराज्य घडवण्यासाठी युवकांची मनगटे बळकट करण्याची गरज असते. हाच शिवविचार घेऊन आम्ही सर्वजण युवा रोजगारासाठी काम करत आहोत, त्यात आपणा सर्वांचा सहयोग असू द्यावा, असे ही ते म्हणाले. सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसंस्कार भव्य सन्मान सोहळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 
     यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष मोरे, मातृभूमी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ सोनल लेले, शिवसंस्कारचे कार्याध्यक्ष गणेश ठाकूर, मुख्य समिती सदस्य अॅड सोनू गवस, संदेश देसाई, सौ सोनम ठाकूर, मनोज शेडगे, डॉ संगीता चांदेकर, निलेश केरकर, उदय देसाई, मंदार गावडे, नितीन नाईक, सौ. वृषाली शिंदे, डॉ. अंकुश सुद्रिक, अभिजीत राऊळ, कृष्णा करमळकर, सौ. गौरी सुद्रिक, उदय पास्ते, सौ. संध्या प्रसादी, सौ संगीता चांडक, अवधूत किरपेकर, अवधूत बीचकर, रुपेश पाटील आदी उपस्थित होते.