कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता.

मुंबई.

   राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असेही आवाहन करण्यात आले.
   हवामान विभागाच्या अंदाजानुसाार, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. याशिवाय, मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांसह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. राज्यात येत्या ४ ऑगस्टपर्यंत हा पाऊस कायम राहणार आहे. तर, ५ ऑगस्टपासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होऊ शकतो, असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
    आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.  4 ऑगस्टपर्यंत राज्यात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले. माणिकराव खुळे यांना दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 14 जिल्ह्यात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मुंबईशहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली  आणि चंद्रपूर या 14 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनं प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.