वेंगुर्ला येथील होडावडा पुलावर पाणी.......वाहतूक ठप्प

वेंगुर्ला
वेंगुर्ले- सावंतवाडी मार्गावरील होडावडा पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हे पुल कमी उंचीचे रस्त्यालगत असल्याने दरवर्षी या पुलावर पाणी येते आणि वाहन चालकांसह नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. मात्र पुलाची उंची वाढविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. वेंगुर्ले-सावंतवाडी मार्गावरील होडावडा गावातून वाहणारे नदीवर हे पूल आहे. होडावडा आणि तळवडे या दोन गावांमधील हे पूल रस्त्यालगत कमी उंचीचे आहे. दरवर्षी नदीला पूर आला की नदीचे पाणी पुलावरून वाहते आणि या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. परिणामी नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना पाणी कमी होऊन पूल सुरळीत होण्याची वाट बघावी लागते किंवा आपली वाहने अन्य मार्गाने वळवावी लागतात. यात सर्वांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. दरवर्षी उद्भवणारी ही समस्या गंभीर आहे असे स्थानिकांकडून बोलले जाते.