साळगाव येथे युवा फोरम संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रेनकोटचे वाटप.

साळगाव येथे युवा फोरम संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रेनकोटचे वाटप.

कुडाळ.

  युवा फोरम इंडिया या संस्थेच्या माध्यमातून साळगाव गावांमध्ये शेतकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे आयोजन ॲड यशवर्धन जयराज राणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
   पावसाळ्यात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीकामात मदत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. शेतकरी पावसाळ्यात पिकांची काळजी घेताना पावसात भिजून काम करतात, त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. याच पार्श्वभूमीवर, रेनकोटचे वाटप करून शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या कठीण परिस्थितीत सुरक्षितता प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
   या कार्यक्रमाच्या वेळी ॲड.यशवर्धन जयराज राणे म्हणाले, "शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे. त्यांच्या कष्टाचे मोल केवळ शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. आम्ही त्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे, आणि अशा प्रकारे त्यांना थोडासा आधार मिळेल अशी आमची अपेक्षा आहे."
   युवाफोरम इंडिया संस्थेचे सदस्य केतन शिरोडकर, रोहन करमळकर, सर्वेश पासवसकर, भूषण गावडे, दीपक रावळ, सिद्धेश परब, रवी, रोहित आटक, शुभम शिदगिकर, भूषण मिस्त्री आणि इतर देखील या प्रसंगी उपस्थित होते.त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि अशा प्रकारच्या उपक्रमांनी त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा विश्वास व्यक्त केला.तसेच  सळगाव गावाचे उपसरपंच गजानन पवार, अमित दळवी, वैभव पवार आणि सळगाव शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. 
    स|ळगाव येथील शेतकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आणि आभार मानले. या मदतीमुळे पावसाळ्यातील त्यांचे काम अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल अशी त्यांनी आशा व्यक्त केली.