राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा; सातारा आणि पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी.

राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा; सातारा आणि पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी.

मुंबई.

   राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज वर्तवला आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन देखील करण्यात आले.
   हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह मराठवाडा, संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
   या कालावधीत महाराष्ट्रात काही ठिकाणी कडक ऊन देखील पडणार आहे. जिथे कडक ऊन पडणार त्या ठिकाणी चांगला पाऊसही पडणार असल्याचे डख म्हणाले. महाराष्ट्रात आज बहुतांशी भागात पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सातारा आणि पु्ण्यात मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, मुंबई आणि ठाणेसह कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही आज पावसाच्या सरी कोसळतील.