भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; अटीतटीच्या सामन्यात भारताने ६ धावांनी मिळवला रोमहर्षक विजय.

न्यूयॉर्क.
भारत विरुद्ध पाकिस्तानचा महामुकाबला आज पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर भारताने ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवत पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या महायुद्धामध्ये भारताचा विजय झाला. फलंदाजांचे नाणे शांत राहिले परंतु गोलंदाजांनी दमदार कामगिरी करून विजय मिळवला.
या सामन्याच्या सुरुवातीलाच चाहत्यांची निराशा झाली. ज्या गोष्टीची क्रिकेट चाहत्यांना भीती होती ती म्हणजेच सामान्याच्या दरम्यान पाऊस. पाऊसामुळे सामन्याला उशीर झाला. पावसामुळे सामना नियोजित वेळेच्या दीड तास उशिरा सुरु झाला. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा फलंदाज विराट कोहलीचा पहिलाच विकेट नसीम शाह याने घेतला. त्यानंतर लगेचच भारताचा कर्णधार रोहित शर्माने त्याचा विकेट गमावला. विराटने ३ चेंडूंमध्ये ४ धावा केल्या तर रोहितने १२ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या. भारताचे दोन विकेट्स गेल्यानंतर अक्षर पटेलला फलंदाजीसाठी मैदानात पाठवले. अक्षर पटेल आणि रिषभ पंत या जोडीने भारताच्या संघाला ५८ धावांपर्यत पोहोचवले.
अक्षर पटेलला नसीम शाहने आऊट केले. भारताच्या फलंदाजी डगमगल्यामुळे विकेट्स लवकर गेले. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अर्शदीप सिंह, सूर्यकुमार यादव हे फलंदाज फार काळ मैदानामध्ये टिकले नाही. त्यामुळे भारताच्या संघाला पाकिस्तानने ११९ धावांवर गुंडाळले. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या फलंदाजीचा विचार केला तर पाकिस्तानची सलामी जोडी मोहम्मद रिझवानने पाकिस्तानला दमदार सुरुवात करून दिली. परंतु जसप्रीत बुमराह समोर पाकिस्तानचे कर्णधार बाबर आझमला फार वेळ टिकू दिले नाही. कर्णधार बाबर आझमने १० चेंडूंमध्ये १३ धावा करून पाकिस्तानने पहिला विकेट्स गमावला. पाकिस्तानच्या कर्णधारचा विकेट्स गेल्यानंतर त्यांची फलंदाजी डगमगली आणि पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने सर्वाधीक ४४ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या.