भाजीपाला व फळ विक्रेत्यांना वटपौर्णिमेपर्यंत रस्त्याच्या बाजूला बसण्याची परवानगी द्यावी. विशाल परब यांनी केली मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी.

भाजीपाला व फळ विक्रेत्यांना वटपौर्णिमेपर्यंत रस्त्याच्या बाजूला बसण्याची परवानगी द्यावी.   विशाल परब यांनी केली मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी.

सावंतवाडी.

    बाजारपेठेत रस्त्याच्या बाजूला भाजीपाला तसेच फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना वटपौणिमेपर्यंत त्याच ठिकाणी बसण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी आज सावंतवाडीचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे केली. त्या ठिकाणी गेले काही महिने बसत असलेल्या व्यापाऱ्यांना आज तिथून उठून जाण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर तेथील व्यापाऱ्यांनी परब यांच्या नेतृत्वाखाली श्री. साळुंखे यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी वटपौणिमा सण होईपर्यंत त्या ठिकाणी बसण्यास आम्हाला परवानगी देण्यात यावी अशी यावेळी मागणी करण्यात आली. त्यावेळी आपण मागणीचा विचार करू व योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. यावेळी माजी नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, सुधीर आरवडेकर, उत्कर्षा रासोलकर, भाजपा सरचिटणीस विनोद सावंत, केतन आजगावकर, अमित गवंडकर, अमित परब, गणेश कुडव, सागर मठकर, शक्ति केंद्रप्रमुख बंटी जामदार, मंदार पिळवणकर, अजय सावंत आदी उपस्थित होते.