विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार नारायण राणेंना जाहीर पाठींबा.

विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार नारायण राणेंना जाहीर पाठींबा.

सावंतवाडी.

   महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रथम निवडून आल्यापासून कोकणातील गोरगरीब जनतेला वेळोवेळी मदत केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा घोषीत करुन घेतला,कोकणातील पर्यटन स्थळांचा विकास,रस्त्यांचे रुंदीकरण,नळ योजना सुरु केल्या.ज्यावेळी शासकीय योजनांचा लाभ येथील लोकांना मिळत नव्हता,त्यावेळी कोकणातील गोरगरीबांना गरजूंना, आजारी व्यक्तींना  राणे यांनी भरपुर आर्थिक मदत दिली. नारायण राणे सारखा दुरदृष्टी असलेला अभ्यासू नेता पुन्हा जिल्ह्यात होणे कठीण आहे.पुर्वी एका विधानसभा मतदार संघापुरते मतदान करण्यास मतदारांना मिळत होते. जिल्ह्यातील प्रत्येक गावात राणे यांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले आहे. आता त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील लोकांना समजावून सांगून नारायण राणे यांना लोकसभेत विजयी होण्यासाठी भरघोस मते मिळवून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे आणि हीच ती वेळ! जिल्ह्याच्या विकासासाठी नारायण राणे यांना विजयी करणे अत्यावश्यक आहे.असे प्रतिपादन विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले.
   विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने नारायण राणेंना जाहीर पाठींबा देण्यात आला त्यावेळी मंगेश तळवणेकर, लक्ष्मण देऊळकर,प्रकाश सावंत,नारायण कारिवडेकर,अजय सावंत,संतोष हरमलकर,भालचंद्र राऊळ, सुधीर नाईक,प्रकाश जाधव,सागर सावंत,भरत गंगावणे, बाळकृष्ण नाईक,संतोष नाईक उपस्थित होते.