आजच्या युवा पिढीला फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची खरी गरज : प्रा.नंदगिरीकर. डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह वेंगुर्ला येथे समता पर्वचे आयोजन.

आजच्या युवा पिढीला फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची खरी गरज : प्रा.नंदगिरीकर.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह वेंगुर्ला येथे समता पर्वचे आयोजन.
आजच्या युवा पिढीला फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची खरी गरज : प्रा.नंदगिरीकर.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह वेंगुर्ला येथे समता पर्वचे आयोजन.

वेंगुर्ला. 

   आजचा भारत देश संकटात सापडले आहे,अशा विपरीत अवस्थेत देशाला आजच्या युवा पिढीला फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची नितांत आवश्यक आहे.युवकांनो आणि तरुणांनो महापुरुषांचे साहित्य वाचा,आत्मसाद करा, क्रांतीची मशाल पुन्हा एकदा प्रज्वलित होईल,तसेच सर्व महापुरुषांना जातीच्या चौकटीत न बसवता त्यांची एकाच विचाराने प्रेरित झालेल्या महापुरुषांच्या विचारांची आजच्या युवा पिढीला खरी गरज आहे असे प्रतिपादन प्रा.नंदगिरीकर यांनी वेंगुर्ला येथे केले.
   यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय मुलांचे वसतिगृह वेंगुर्ला येथे सहाय्यक आयुक्तालय सिंधुदुर्ग यांच्या संलग्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह, वेंगुर्ला यांच्या माध्यमातून ‘समता पर्वचे’ आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर" यांची १३३ व्या संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला होता यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी विचारमंचावर वसतिगृह गृहपाल डॉ.कुणाल इंदलकर,भाऊ कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय मुलांचे वसतिगृह वेंगुर्ला येथे, विद्यार्थी वर्गासाठी विविध कार्यक्रम पार पडले.यामध्ये शिव,फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देण्याच्या हेतूने भव्य निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन हे जेष्ठ सामाजिक न्याय विभागाचे निवृत्त कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, वेंगुर्लाचे विद्यमान गृहपाल,डॉ.कुणाल इंदलकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्धेशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.या संयुक्त जयंती महोत्सवाची सुरवात सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती पासून झाली.यामध्ये विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.यावेळी विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
   यावेळी वसतिगृह कर्मचारी वडार, नंददीपक जाधव, सुहास जाधव, दामोदर जाधव, रामचंद्र राऊळ, सचिन जाधव,ॲड. किशोर खरात सर्व महिला कर्मचारी,आणि सर्व वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.