भारताचा एअर स्ट्राईक.....पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर स्ट्राईक करुन अतिरेक्याना कंठस्नान

दिल्ली
अखेर भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. भारतीय सैन्यांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्यांनी पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर लक्ष्य केले. ७ मे रोजी मध्यरात्री दीड वाजता सुरक्षा दलांनी पीओके आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला.या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ९० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुरडिकेमध्ये ३० दहशतवादी मारले गेले. इतर छावण्यांमध्येही डझनभर दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भारताचे ऑपरेशन सिंदूर सक्सेस झाल्याचे म्हटले जात आहे.