वेंगुर्ला पोलिसांतर्फे शहरात रस्ता सुरक्षा अभियान.

वेंगुर्ला.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहरातील गाडीअड्डा तिठा येथे वेंगुर्ला पोलिसांतर्फे व्यापारी, रिक्षा चालक, दुचाकी चारचाकी वाहनधारक यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीत वाहतूक नियमांचे पालन करणे, रिक्षा भाडे नियमानुसार घेणे, वाहने योग्यरित्या पार्क करणे, ट्रिपल शिट न घेणे, हेल्मेटचा वापर करणे, फॅन्सी नंबर प्लेट तसेच कर्कश व मोठ्याने वाजणारे सायलेन्सरचा वापर न करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे, क्षमतेपेक्षा वाहनात प्रवाशी न घेणे,लहान मुलांच्या हाती वाहन चालविण्यास न देणे, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे या बाबत वेंगुर्ला पोलिस निरिक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस मनोज परुळेकर व गौरव परब यांनी मार्गदर्शन करीत नियम पाळण्याचे आवाहन केले.
यावेळी पोलिस निरीक्षक अतुल जाधव,वाहतूक पोलिस गौरव परब, मनोज परुळेकर, पोलिस कॉन्स्टेबल अमर कांडर, सहायक पोलिस निरीक्षक संदेश कुबल, पोलिस हवालदार सुरेश पाटील, बंटी सावंत तसेच रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष भाई मोर्जे, गणपत रेडकर, अरुण नाईक, सतीश परब, भगवान मोर्जे, काका पालकर, सदानंद परब, रिक्षा टेम्पो युनियन अध्यक्ष शेखर शेणई, मकरंद भोगटे, तुषार शेणई, अमर नाईक, दिलीप बागवे, हर्षद पालव, महेंद्र स्वार, चंद्रकांत चोडणकर शुभम गवळी, दिगंबर धोंड आदी व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.