घोणसरी ग्रामपंचायत मार्फत आपत्कालीन परिस्थितीत उद्भवलेल्या कुटुंबांना अर्थसहाय्य प्रदान

घोणसरी ग्रामपंचायत मार्फत आपत्कालीन परिस्थितीत उद्भवलेल्या कुटुंबांना अर्थसहाय्य प्रदान


कणकवली
    ग्रामपंचायत घोणसरी येथे आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेल्या कुटुंबांना अर्थसहाय्य  देण्याचे काम पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर करण्यात आले. त्या अंतर्गत श्रीम.मुक्ता संदीप परब व श्री.विनोद जयवंत कारेकर यांना प्रत्येकी 15000 र त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यामुळे या कुटुंबांना ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या या अनुदानामुळे आर्थिक हातभार लागला आहे.
    या कार्यक्रमावेळी घोणसरी सरपंच श्री प्रसाद राणे, श्री. सौ. प्राची राणे, सौ.सुप्रिया आचरेकर, श्री. सतिश जाधव, श्री.सचिन सुतार, श्री.विजय सुतार, श्री.संतोष परब, श्री. रमेश शिंदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.