कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता महाविकास आघाडीच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा : विनायक राऊत. वेंगुर्ला येथे माजी खासदार राऊत यांचे प्रतिपादन.

वेंगुर्ला.
निवडणुकीमध्ये जय पराजय होत राहतो. कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता, पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.लोकसभा निवडणुकीत पैशाच्या महापुरामुळे माझा पराभव झाला हे सत्य आहे पण पराभवाने मी खचलेलो नाही. हा पराभव माझा एकट्याचा आहे. इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी जीव तोडून प्रामाणिकपणे काम केले. म्हणूनच मते विकत न घेता ४ लाख मतदारांचा आपल्याला आशीर्वाद लाभला. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला महाराष्ट्राने भरभरून साथ दिली. पैशाचा महापूर दूर सारून राज्यात नंबर एकचे मताधिक्य दिले. हाच उत्साह पदाधिकाऱ्यांनी साजरा करून पुढील निवडणुकात या मतदार संघाच्या पराभवाचा वचपा नियोजनाने काढा असे प्रतिपादन माजी खासदार तथा ठाकरे शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी वेंगुर्ला आयोजित महाविकास आघाडीच्या बैठकित काढले.
येथील साई मंगल कार्यलयात लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच इंडिया आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार असलेले माजी खासदार विनायक राऊत यांनी वेंगुर्ला तालुक्याला भेट देत इंडिया आघाडीतील सर्व मित्रपश्नांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय नेत्या अर्चना घारे-परब कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला आघाडी नेत्या जानवी - सावंत, ठाकरे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाद, तालुका प्रमुख पंकज शिरसाट, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, ठाकरें सेनेचे तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, काँग्रेसचें तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, सेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश निकम, प्रकाश गडेकर सेनेच्या महिला आघाडीच्या सुमन निकम, सुकन्या नरसुले, अस्मिता राऊळ, अँड.किशोर वरक यासह इंडिया आघाडीतील मित्रपश्नांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने या सभेला उपस्थित होते.