रत्नागिरीत महाविकास आघाडीची 'मशाल रॅली'.

रत्नागिरी.
रत्नागिरी शहरात जयस्तंभ ते काँग्रेस भवनपर्यंत रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारात काढलेल्या भव्य मशाल रॅलीने शहर परिसर दुमदुमून गेला. हाती पेटलेल्या मशाली आणि महाविकास आघाडीचे विजयी फलक घेऊन कार्यकर्त्यांच्या 'जय भवानी, जय शिवाजी.. 'चा जयघोष करत रॅलीमध्ये वाजणाऱ्या क्रांती गीताने चेतना निर्माण केली. शुक्रवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या या रॅलीचे स्वरुप भव्य व उत्साही होते. जयस्तंभ येथून निघालेल्या या रॅलीने शहरभर शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला. या रॅलीचा शुभारंभ जयस्तंभ येथे 'उबाठा' शिवसेनेचे युवानेते वरुण सरदेसाई, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, ज्येष्ठ नेते प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, राष्ट्रवादीचे बशीर मुर्तुझा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, संजय साळवी, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद आदींनी केला. या रॅलीमध्ये युवक आणि महिला यांचा सहभाग होता. रॅलीमध्ये शिवसेनेच्या वाजणाऱ्या क्रांती गीताने लोकांमध्ये चेतना निर्माण केली. राऊतांच्या प्रचारासाठी शहरात निघालेल्या शिवसेनेच्या रॅलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण शहरभर शिवसेनेने काढलेल्या या रॅलीला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.दरम्यान, महाविकास आघाडीतर्फे मशाल चिन्हाचे बटन दाबून विजयी करा,असे आवाहन करण्यात आले.