डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तत्वे स्वावलंबी भारताला चालना देतील - पंतप्रधान मोदी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तत्वे स्वावलंबी भारताला चालना देतील - पंतप्रधान मोदी

 

दिल्ली

 

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी समर्पित वृत्तीने कार्यरत आहे. त्यांची तत्वे आदर्श, स्वावलंबी आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवन संकुलातील त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, डॉ. आंबेडकरांची तत्वे आणि विचार स्वावलंबी आणि विकसित भारताच्या निर्मितीला गती देतील. त्यांच्या प्रेरणेमुळेच देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी समर्पित आहे.काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.