लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदान.

सिंधुदुर्ग.
लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४४.७३ टक्के एवढे मतदान झाले आहे. यामध्ये कुडाळ मतदारसंघात सर्वाधिक ४८.४४ टक्के एवढे मतदान झाले. तर रत्नागिरी मतदारसंघात ४१ टक्के एवढे मतदान झाले आहे.मतदानाची टक्केवारी चिपळूण ४६.७२ टक्के, रत्नागिरी ४१.०० टक्के, राजापूर ४१.६८ टक्के, कणकवली ४६.४० टक्के, कुडाळ ४८.४४ टक्के, सावंतवाडी ४५.०१ टक्के अशी आहे.
सकाळी ११ वाजेपर्यंत मतदारसंघात एकूण २१.१९ % एवढे मतदान झाले होते. तर दुपारी एक वाजेपर्यंत ३३.९१ टक्के एवढे मतदान झाले आहे.