महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी ८७७.९७ किलोमीटर

महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी ८७७.९७ किलोमीटर

 

दिल्ली

 

      केंद्र शासनाच्या नवीन सर्वेक्षण अहवालानुसार आता महाराष्ट्राची किनारपट्टी ८७७.९७ किलोमीटर झाली आहे. याबाबतची माहिती शासनाच्या सीमा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेनुसार समजली आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील किनारपट्टीची लांबी ७२० किलोमीटर अशी गणली जात होती. परंतु या सर्वे नंतर आता ही लांबी त्यापेक्षा मोठी असल्याचे उघड झाले आहे. याबाबतची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. यात महाराष्ट्राची ८७७.९७, गुजरातची २३४०.६२, गोव्याची १९३.९५, कर्नाटकची ३४३.३०, केरळची ६.१५, तामिळनाडूची ८.६९, आंध्र प्रदेशची १०५३.०७ अशी मिळून भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी ११०९८.८१ इतकी आहे. अशी माहिती एम. एच.ओ. च्या माध्यमातून देण्यात आली आहे. नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. झालेल्या बैठकीत याबाबत सर्वेक्षण पुन्हा एकदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही लांबी मोजण्यात आली आहे.