चाहुल दिवाळ ची, वाढवी गोडी फराळाची

परुळे प्रतिनिधी
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, दिव्यांची रोषणाई, विविध फराळ, प्रत्येक घरात दिवाळीनिमित्त केल्या जाणाऱ्या अनेकविध प्रकारांत चकली, करंज्या, लाडू, शंकरपाळी, अनारसे, चिवडा अशा खाद्यपदार्थांना पसंती दिली जाते. यात काही गोड पदार्थ असतात, तर काही खमंग असतात. या प्रत्येक पदार्थाचं महत्त्व फक्त त्याच्या चवीशी नाही, तर त्यामागे असलेली आपली वैभवशाली परंपरा, देवादिकांवरील अढळ श्रद्धा, प्राचीनता आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेल्या संस्कृतीशी जोडलेलं आहे. उदाहरणार्थ, लक्ष्मीपूजनाला अनारशांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा अनेक घरांमध्येअसते. दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच अनेक घरांमध्ये फराळाचीतयारी सुरू होते. गव्हाचे पीठ, बेसन, साखर, तूप यांसारख्या फराळासाठी आवश्यक घटकांच्या खरेदीमुळे बाजारपेठेत मोठीउलाढाल होते. ग्रामीण भागातल्या शेती आधारित कुटुंबांपासून शहरी जीवनशैलीत रुळलेल्या प्रत्येक घरात दिवाळी फराळाची ही परंपरा कायम आहे. बदलत्या कुटुंबव्यवस्थेत दिवाळी फराळाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. त्यामुळे दिवाळीचा फराळ ही केवळ खाद्यपदार्थांची परंपरा नसून, ती घरातल्या एकतेचं आणि आपुलकीचं प्रतीक म्हणून पुढे येत आहे. फराळाच्या पदार्थांच्या निमित्ताने कुटुंबातले सर्वजण एकत्र येतात. गप्पागोष्टी करत, हास्याचे फवारे उडवत हे पदार्थ तयारकरण्याच्या प्रत्येकक्षणाचा आनंद एकत्रितपणे घेतला जातो. सध्याच्या काळात फराळाचे बहुतांश पदार्थ विकत घेण्याकडे अनेकांचा कल असल्याचं दिसून येतं. असं असलं, तरीही किमान देवाच्या प्रसादापुरत्या करंज्या घरीच करण्याकडे महिलांचा कल असतो. फराळाचे पदार्थ आणि ते करण्याची पद्धत महाराष्ट्राच्या विविध भागांनुसार बदलते. स्थानिक चवीचा प्रभाव
फराळाच्या पदार्थांवरहमखास पडतो. तसंच त्या प्रदेशाच्या संस्कृतीचाही परिणाम फराळ करण्यावर होतो. आपल्या कोकणात दिवाळीला गोड किवा तिखट पोहे रताळ उकडलेले असा फराळ केला जातो. हा कालावधी शेतातून नवीन पीक घरात आलेल्या असत विशेषत कोकणात भात पीक होते. त्यामुळे त्यांचं समावेश दिवाळी फराळासाठी केला जातो. आता सध्या या बरोबरच लाडू करंजी चकली चिवडा हा फराळ हि केला जातो किवा खरेदी केला जातो गावोगावी महिला बचत गटाच्या महिलांनी फराळ तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. त्यातून त्यांना रोजगार मिळत. दिवाळी फराळाच्या निमित्तानं होणारी आर्थिक उलाढाल लक्षणीय असते. किराणा बाजार, मिठाईची दुकानं, आणि गृहउद्योगयांच्यासाठी हा काळ सर्वात महत्त्वाचा असतो. दिवाळीच्या आधी बाजारपेठेत गर्दी वाढते. गोडधोड पदार्थ, फराळाचे पदार्थआणि किराणा सामानाची मागणी वाढलेली असते. दरवर्षी दिवाळीदरम्यान हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते प्रमुख शहरांमध्ये तर याकाळात विक्रीचं प्रमाण दुपटीनं वाढतं. सणासुदीच्या काळात मोठ्या शहरांपासून लहान गावांपर्यंतखाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये विशेष तयारी असते. फराळाची ऑर्डर घेणारे गृहउद्योग, आणि मोठ्या ब्रँड्सच्या रेडीमेड फराळाच्या पदार्थांमध्येही मोठ्या प्रमाणात विक्री होते.