तुळस येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४३ जणांनी केले रक्तदान.

तुळस येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४३ जणांनी केले रक्तदान.

वेंगुर्ला.

  वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ तुळस आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस (तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था मुंबई,बहुउद्देशीय सभागृह) येथे रक्तपेढी सावंतवाडीच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते संदीप पेडणेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आले.
   यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळस सरपंच रश्मी परब, उद्घाटक संदीप पेडणेकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या मधुकर शिंगारे, मानसी बागेवडी,प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर,सचिव प्रा.डॉ.सचिन परुळकर,सुजाता पडवळ,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे जिल्हाउपाध्यक्ष महेश राऊळ,सद्गुरू श्री स्वामी समर्थ मठचे मिलिंद शेटकर,तुळस पोस्ट मास्तर दिलीप वेंगुर्लेकर,प्राजक्ता रेडकर,अनिल खाडे, प्रा.जी.पी.धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
   आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुआयामी कार्यक्रम करणारी वेताळ प्रतिष्ठान ही अग्रणी संस्था असून त्यांनी जे लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे,आजपर्यंत त्यांनी २४ रक्तदान शिबिरे यशस्वी पार पाडली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते असे मनोगत वैद्यकीय अधिकारी डॉ विद्या शिंगारे यांनी व्यक्त केले.
   सामाजिक कार्यकर्ते संदीप पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त करताना रक्तदान सारख्या उपक्रमाचे आयोजन करून वेताळ प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जपत आहे.सद्यस्थितीत युवक समाजात दिशाहीन वावरत असताना प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील तरुण एकत्र येत स्वच्छता, वृक्षारोपण, गडकिल्ले संवर्धन,व्यावसायिक प्रशिक्षणे अशा समाजहिताचे उपक्रम राबवित आहे.सामाजिक उपक्रमासह कला,क्रीडा व शैक्षणिक उपक्रमातही योगदान उल्लेखनीय आहे.अशा प्रकारे आजच्या युवा वर्गाला दिशा देणारे आदर्शवत काम सर्वांना प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन केले.
      यावेळी सरपंच रश्मी परब यांनी प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत उपक्रमांस शुभेच्छा दिल्या.शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वेताळ प्रतिष्ठानच्या सागर सावंत, माधव तुळसकर, सद्गुरू सावंत, मंगेश सावंत,प्रदीप परुळकर, राजू परुळकर,प्रसाद भणगे, विधी नाईक, वैष्णवी परुळकर, जान्हवी सावंत,हेमलता राऊळ, प्रतिक परुळकर, प्राची गोरे, भूमी परुळकर यांनी मेहनत घेतली.सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर व आभार किरण राऊळ यांनी मानले.