दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतील का? धर्म विचारत बसतील का?.....सरकार लोकांना भरकटवतय....विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

मुंबई
काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन व्हॅलित झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. २२ एप्रिलला घडलेल्या या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतील का? धर्म विचारत बसतील का? सरकार लोकांना भरकटवतय, असा आरोप वडेट्टीवारांनी केला. वडेट्टीवार म्हणाले, 'सत्ताधारी लोक भारत पाकिस्तान असा जप करत बसतात. पहलगाममध्ये घडलेल्या हल्ल्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. हे सरकारच अपयश आहे, हे त्यांनी स्वीकाराव. मुख्य म्हणजे काश्मीरच्या खोऱ्यात सुरक्षा का नव्हती? तेथील सुरक्षा व्यवस्था का हटवण्यात आली होती? अतिरेकी सीमा ओलांडून २०० किलोमीटरपर्यंत आत घुसलेच कसे? त्यावेळी मोदी सरकार नेमक काय करत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, पहलगाम हल्ल्यावर सरकारमधील कुणीच काहीही बोलायला तयार नाही. हे लोक (सत्ताधारी) काय बोलतात, दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून मारल. मुळात दहशतवाद्यांना यासाठी वेळ होता का? पर्यटकांच्या जवळ जाऊन, त्यांच्या कानात बोलायला, त्यांना धर्म विचारायला वेळ होता का? काही लोक म्हणतात धर्म विचारले, तर काही म्हणतात अस काहीच घडलेल नाही, मुळात दहशतवाद्यांचा धर्म किंवा कुठलीही जात नसते, सरकारने मूळ मुद्यावरून लोकांना भरकटवू नये अस त्यांनी पुढे म्हटल. तसेच त्यांनी दहशतवाद्यांसह या कटात सामील असलेल्या लोकांनाही पकडून त्यांच्यावरही कारवाई करा, हीच देशातील सर्व नागरिकांची भावना असल्याच त्यांनी म्हटलय.
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल आहे. 'खरतर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन, मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम सुरू आहे. आपण त्यांच्या नातेवाईकांच म्हणण माध्यमाद्वारे ऐकल. प्रत्यक्षदर्शींनीच सांगितल की धर्म विचारला होता. त्यावेळी त्या ठिकाणी वडेट्टीवार होते का? इथे बसून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण अतिशय वाईट आहे अस फडणवीस म्हणाले.